BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दुष्काळी अनुदानासाठी ई केवायसी करा Do e KYC for drought subsidy

 शिराळा,ता.२८:शिराळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याने  शेतकऱ्यांनी ई केवायसी  ३१ मे अखेर पुर्ण करावीत असे आवाहन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले आहे.

  यावेळी खोत पाटील म्हणाल्या,ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत आहेत त्यांनी ३० मे अखेर बँक पासबुक , आधारकार्ड तलाठी , ग्रामसेवक यांच्याकडे डाटा अपलोड करण्यासाठी द्यावेत. ३१ मे पर्यंत शेतकऱ्यांनी ई केवायसी  पुर्ण करावी.त्या नंतर ई केवायसी पूर्ण  करता येणार नाही. जे शेतकरी लाभार्थी परगावी आहेत. त्यांनी आपला पंचनामा क्रमांक घेऊन ज्या ठिकाणी आहेत तेथून ई केवायसी  पुर्ण करावी. यासाठी  महा ई सेवा ,  ग्रामपंचायत संग्राम संगणक चालक ,एकत्रित सुविधा केंद्र , सेतू येथे ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी ई केवायसी  पुर्ण न केल्यास ते लाभार्थी दुष्काळ निधीच्या अनुदानापासून वंचित राहतील. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील , निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी  उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments