BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कर्तृत्ववान नेतृत्व-विराजदादा

 


समाजकारणाचा वारसा घेवून निघालेले एक दूरदृष्टीचे, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रातीच्या प्रगतीसाठी झटणारे उच्च विद्याविभूषीत नेतृत्च म्हणून विराज नाईक दादा यांच्याकडे आम्ही पहात आहोत. नाईक घराण्याचा समाजकारणाचा वारसा व आमदार मानसिंगभाऊं नाईक यांच्या विकासवादी नेतृत्व गुण घेवून विराजदादांनी घोडदौड सुरू ठेवली. शिराळा विधानसभा मतदार संघात विकासाची किमयाच केली आहे. विश्वासराव नाईक साखर कारखाना बरोबरीने विश्वास उदयोग व विराज उदयोग समुह निर्माण करण्याचे काम भाऊंनी केले. त्यामुळे आज भाऊ शिराळा वाळवा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भाऊंचे कार्य जवळुन पाहण्याचे भाग्य त्यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विराज नाईक (दादा) यांना लाभले. आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेन्यासाठी भाऊचे नेतृत्व व मार्गदशनाखाली दादांनी ५ वर्षा पूर्वी राजकारण व समाज कारणामध्ये सकीय सहभाग घेतला. सर्व प्रधम भाऊंनी त्यांच्यावर विराज उदयोग समुहाची जबाबदारी दिली.

दादांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या कसोटीवर ती जबाबदारी लिलया पार पाडली. विराज उदयोग समुह प्रगती पथाच्या एका नव्या वळणावर नेऊन ठेवला आहे. विराज उदयोग समुह यशस्वीपणे संभाळण्याचा प्रमाणिक प्रयत्न ते करीत आहेत. त्यातुनच शिराळा, वाळवा विधानसभा मतदार संघामध्ये एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला. विराज नाईकदादा हे सुसंस्कृत, उच्च विदयाविभुषीत, शांत व संयमी असलेमूळे युवकांच्या मनामध्ये आदरयुक्त स्थांन त्यांनी निर्माण केले. आपल्या भागाच्या विकासाकामी तालुक्यामध्ये त्यांनी गाववार दौरे करून भौगोलिक परिथितीचा अगदी जवळुन अभ्यास केला आहे. सर्व सामान्य लोकांच्या अनेक समस्यांचे निराकारण पंचायत समिती, तहसिल ऑफिस मधील कामे अगदी सहजपणे पुर्ण करण्याचा दादांनी प्रयत्न केलेला आहे.

राजकीय दृष्टया युवक नेता म्हणुन मा. आमदार भाऊंचे नेतृत्व बळकट करण्यासाठी तसेच पक्षीय संघटन मजबुत करण्याकामी गाववार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा निर्माण करण्याचे काम दादा आजही करत आहेत. गेल्या ३ वर्षापुर्वी व याही वर्षी अतीवृष्टीमुळे वारणा व कृष्णा नदयांना आलेल्या महापुरामुळे नदीच्या काठावर असणाऱ्या अनेक गावांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुसकान व हाल झाले. या विपरीत परिस्थीतीमध्ये आपल्या भागाचा दौरा करून लोकांना धीर व आधार देण्याचे काम दादांनी केले. तसेच आमदार भाऊच्या मार्गदर्शनाखाली लोकांना आरोग्य सुविधा जीवनावश्यक वस्तु तसेच संसार उपयोगी साहित्य जनावरांना पशुखादय उपलब्ध करून वाटप करण्याचे काम केले आहे.

तसेच २ वर्षा पासुन आलेल्या कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे लोकांचे झालेले हाल पाहुन दादा सतत व्यवस्थित होते. आपण या परथितीमध्ये लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार ते सतत करीत होते. त्याकामी त्यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र तसेच ग्रामिण जिल्हा उप रुग्नालय येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर मशिन, सानिटायझर मास्क फेस सिल्ड मास्क, पिपीई किट इ. साहित्याचे वाटप केले. आरोग्य सेविका, तसेच अंगणवाडी सेविका यांना सुदधा गाव स्तरावर या साहित्याचे वाटप केले.

तालुक्याचे तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना वरील सर्व साहित्य देण्याचा अभिनव उपक्रम दादांनी राबवला आहे. तसेच तालुक्तातील सर्व गावामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातुन लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे या कामी कोरोना या साथीमध्ये अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप गाववार प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहोच करणेचे महत्वपुर्ण काम करून लोकांना आदर देण्याचे काम केले. 

मधल्या काळामध्ये कोरोनाची लाट कमी झाली असता विराज नाईक दादा यांच्या संकल्पनेतुन महिला सबलिकरण कार्यक्रमाअंतर्गत शिराळा विधानसभा मतदार संघातील सर्वगावामध्ये महिलांना कमी दरामध्ये आटा चक्की वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना झाला. आपल्या घरामध्ये आटा चक्की वापरायला शिकण्याचा फायदा ग्रामिण भागातील महिलांना झाला. हा फायदा फक्त दादांच्या नेतृत्वामुळे होऊ शकला.

वरील सर्व कामांचा व या २ वर्षातील कठीण परिस्थीतीमध्ये दादांनी केलेल्या समाज उपयोगी कामाची दखल घेवुन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील साहेब व पक्षातील वरीष्ठ मंडळीनी मा. श्री. विराज नाईक दादा यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली त्यातुनच खऱ्या अर्थाने विराज नाईक दादा यांचे बहुआयामी नेतृत्व जिल्हाभर पोहचले. दादांच्या मनामध्ये सर्व सामान्य लोकांच्या प्रती असणारी अपुलकी तसेच सर्व सामान्य कार्यकर्त्याशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध हे सर्व क्रियाशिल दादांच्या माध्यमातुन अनुभवायला येत आहे हे मी माझे भाग्य समजतो. जिल्हाअध्यक्ष पदी निवड झालेनंतर दादांनी सर्वच तालुक्यांना भेटी देऊन पक्षीय संघटना मजबूत करणे कामी युवकची तालुका कार्यकारणी करणे कामी प्रयत्न केले असुन ते काम अंतीम टप्यात आहे. जिल्हयातील सर्वच तालुक्यामध्ये युवकांना वाटणाऱ्या समस्या जाणून घेण्याचे काम दादा करीत असुन जिल्हयातील युवकांच्यासाठी काहीतरी भरीव काम करणेचा दादांचा मानस आहे. दादासारख्या बहुआयामी, सुसंस्कृत व उच्चविदयाविभुषीत नेतृत्वाने शिराळा तालुक्यातील पाचूंब्री या छोटया गावातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला शिराळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करणेची संधी दिली हे माझे भाग्य समजतो.

दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी मा विराज नाईक दादा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. दादांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थ ना.मा.ना. जयंतराव पाटील साहेब तसेच आमचे नेते आदरणीय आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांच्या मार्गदर्श नाखाली विराज नाईकदादा यांच्या कार्याचा सुगंध सर्व जिल्हाभर सर्वदूर पोहचू दे. हीच सदिच्छा.

हर्षद बाळासो माने-अध्यक्ष (शिराळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

-----------------------------------------------------------

युवकांचे आशास्थान : विराजदादा नाईक


युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष व शिराळा तालुक्यातील युवकांचे आशास्थान विराजदादा नाईक यांच्या नाईक यांच्या आज वाढदिवस त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडेसे.....
विराजदादा नाईक हे शिराळा विधानसभा मतदारसंघात एक युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. नुकतीच त्यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. खरेतर त्यांच्या राजकिय वाटचालीस अलीकडेच सुरुवात झाली आहे. एक उमदे व उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्व म्हणून ते जनतेच्या नजरेत भरले आहेत. विराजदादांच्या राजकीय वाटचाली आमदार Aमानसिंगभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली आहे. सध्या त्यांनी शिराळा मतदारसंघात एक दमदार पाऊल टाकत आपल्या कामास सुरुवात केली आहे.
विराजदादा नाईक हे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष असल्याने सांगली जिह्यातील उमदीपासून ते चांदोली पर्यंत पक्षांमध्ये युवकांचे संघटन करण्याचा चंग बांधला आहे. युवकांची एक मोठी फळी निर्माण करून सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवून पक्षाला बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शिराळा मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. आम्हां सर्व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. लोकांच्या विविध समस्यांवर ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. गावोगावच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटणे व त्यांच्यापर्यंत पक्षाचे विचार, ध्येयधोरणे पोहोचविण्यासाठी ते तत्परतेने काम करीत आहेत. त्यांच्या कार्यात केवळ राजकीय हेतू नसून तालुक्यात एक चांगली सामाजिक वैचारिक बांधणी झाली पाहिजे असे त्याचे म्हणणे असते .
तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. प्रेमळ भाषा व आपुलकी हे वेगळे गुण आहेत. कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी ते आम्हा कार्यकर्त्यांच्या सदैव सोबत असतात .
तालुक्यात कोरोना काळात विराजदादांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. पक्ष तसेच विराज व विश्वास उद्योग समूहामार्फत लोकांना औषधे वाटणे, सॅनिटाईझर वाटणे, लोकांच्या औषधोपचारासाठी मदत असे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे .कोरोनामुळे अत्यंत अडचणीत असलेल्या कुटुंबाना भेटून त्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना आधार देणे असे काम विराजदादा सातत्याने करीत आहेत.
        मतदारसंघात भाऊंच्या तसेच सरकारच्या माध्यमातून विकासकामे झाली पाहिजेत यावर विराजदादांचा मोठा कटाक्ष आहे. मतदारसंघात फिरून जनतेचे प्रश्न पाहून ते सोडविण्यासाठी ते अग्रेसर आहेत. गावोगावी रस्ते, पूल, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू आहे .
विराजदादा स्वतः उचशिक्षित असल्याने मतदारसंघात शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. युवकांच्या संपर्क कार्यक्रमात ते सातत्याने शिक्षणाचा आग्रह धरत आहेत. तालुक्यातील युवकांनी उचशिक्षित होऊन स्वावलंबी व्हावे, असा सल्ला ते नेहमी देत असतात. गाव तेथे व वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे निर्माण झाली पाहिजेत यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
एकंदरीत आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली विराजदादांच्या यशस्वी वाटचाल सुरू असून त्यांच्या कार्यपद्धतीवरून त्यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याचे जाणवत आहे. आम्हा कार्यत्यांच्यासाठी विराजदादादा हे एक आशास्थान आहेत. पुढील काळात एक उगवते नेतृत्व म्हणून ते नावारूपाला येतील यात तिळमात्र शंका नाही. विराजदादांना आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या राजकीय, औद्योगिक, सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !! 

-श्री किरण पांडुरंग पाटील
सरपंच, शिराळे खुर्द (ता. शिराळा)
--------------------------------------------------------

युवकांचा साथी-विराजदादा


शिराळा तालुक्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते व शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणिय स्वर्गिय फत्तेसिंगराव नाईक आप्पा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न हे आजही तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात खोलवर जपून ठेवले आहेत. खरं तर.... स्वतःसाठी जगात नाही आलं. तरी दुसऱ्यासाठी जगून पहावं अन्...... दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसताना त्यामध्ये आपलं प्रतिबिंब पहावं असंच त्यांचं व्यक्तिमत्त्व होते.
स्वर्गीय फत्तेसिंगआप्पांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवुन शिराळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे विद्यमान आमदार मा. मानसिंगराव नाईक (भाऊ) यांनी तालुक्याचा औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व संस्थात्मक विकासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आज आपल्या आजोबांची प्रेरणा व वडिलांचे स्वप्न उराशी घेऊन मा. विराज दादा नाईक या मतदार संघातील युवकांच्या खांद्याला खांदा लावून विकासासाठी झटत आहेत. औद्योगिक विकास, सहा. बॅंका, पतसंस्था, दुध संघ इत्यादी संस्थांचा विकास, शैक्षणिक विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. तालुक्याला पर्यटन विकासाच्या दृष्टीने मिळालेले महत्त्व या दृष्टीकोनातून ते प्रयत्नशील आहेत. प्रामुख्याने छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा येथील भुईकोट किल्ल्याचे संवर्धन व विकासासाठी उचललेली पाऊले उचलली आहेत. यातून विराज दादांच्या व्यक्तीमत्वात दिसणारे वेगळे पैलू दिसतात. याचा विचार करून  सांगली जिल्ह्यांतील एक रत्नपारखी व दृष्टे नेते मा. जयंतरावजी पाटील यांनी दादांची सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी निवड केली आहेत.  त्यामुळे तालुक्याच्या शिरपेचात हा कोहिनूर हिरा बसविला आहे. विराज दादांचा जनसंपर्क व कार्यशैली पहाता असे वाटते......विकास, संस्कृती शिक्षणाने..गरजल्या दिशा दाही...
विराज दादा आपल्या गरुड भरारीस क्षितीज आता दूर नाही.
आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.
- मच्छिंद्र माने (मणदूर)

Post a Comment

0 Comments