BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राहुलच्या चौकशीसाठी फोन आला की जीवाचा थरकाप व्हायचा


ज्यावेळी घटना घडली त्यावेळी वादळी वाऱ्याने विद्युत तार तुटल्याने चार दिवस आमच्या घरी लाईट नव्हती.त्यामुळे टीव्हीच्या बातम्या कळत नव्हत्या.दुसरीकडे जाऊन मोबाईल चार्जिंग केला तर अधून मधून समुद्रात जहाज बुडल्याचे कळायचे.त्यावेळी जीवाचा थरकाप होत होता.राहुलचा फोन पण लागत नव्हता.त्याच्या चौकशीसाठी आम्हाला दिसभर बाहेरून फोन येत होते.पण आम्हाला काहीच माहिती नसल्याने आम्हा सर्वांचा जीव गुदमरून जात होता.मनात नको ते विचार येत होते. चार दिवसाने राहूलने मी सुखरूप असल्याचा फोन केला अन् सुटकेचा श्वास सोडला.

रामचंद्र साळुंखे (राहुलचे वडील)

Post a Comment

0 Comments