BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ईकॉम एक्सप्रेस कंपनीच्यावतीने ४० लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गोटखिंडी(ता.वाळवा) येथील नाईक मळा येथे ईकॉम एक्सप्रेस कंपनीच्यावतीने ४० लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना कर्मचारी शकंर रा.जाधव, किशोर घोरपडे ,संदीप जाधव ,सुनील पाटील, महेश जाधव, अविनाश पाटील


ईकॉम एक्सप्रेस कंपनीच्यावतीने ४० लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


बहादूरवाडी:गोटखिंडी (ता.वाळवा) येथील नाईक मळा येथे ईकॉम एक्सप्रेस कंपनीच्यावतीने ४० लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने गोरगरीब व  गरजु लोकांना सध्या रोजगार उपलब्ध नाही.त्यामुळे त्यांना या अडचणीच्या काळात मदत व्हावी म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून  ईकॉम एक्सप्रेस कंपनीच्यावतीने जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.गेले सव्वा महिना लॉक डाऊन काळात किणी टोल नाका येथे कडक पहारा करणाऱ्या पोलीस बांधवांना ही कंपनीच्यावतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला.
यावेळी कंपनीचे कर्मचारी शकंर रा.जाधव, किशोर घोरपडे ,संदीप जाधव ,सुनील पाटील, महेश जाधव, अविनाश पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments